Friday, December 3, 2021

राष्ट्रनमन

राष्ट्रपती नतमस्तक होणे म्हणजे संपूर्ण देश नतमस्तक होणे. आजघडीला महाराज असते तर काळाची गरज ओळखून त्यांनी नक्कीच रायगडावर हेलिपॅड तयार केले असते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा आपला राजा होता आपण त्यांचे अनुयायी म्हणल्यावर आपणही त्या गोष्टींचा अवलंब करायला हवा. हेलिकॉप्टर उतरताना धूळ उडेल आणि ती पुतळ्यावर जाईल हे आपण लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन त्याची काळजी करेलच पण म्हणून गडावर हेलिकॉप्टरच नको असे म्हणणे काळानुरूप संयुक्तिक ठरणार नाही. उद्या जगातील प्रत्येक देशाचा प्रमुख जरी रायगडावर यायचा म्हणला तरी गडावर तशी सोय असायला हवी. आपल्या राजाचे कार्य आणि महती साडेतीनशे वर्षांपासून सर्वदूर आहे पण ती अशानिमित्ताने पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असते. आपल्याच राज्यातले किती राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्री आजवर गडावर दर्शनाला गेले असतील ? मग राष्ट्रपती येत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. दुर्गराज रायगड हा देशा सोबत जगाच्या पटलावर पुन्हा पुन्हा चर्चेत यावा ज्यातून महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची पुन्हा पुन्हा उजळणी व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.

विशाल गरड
३ डिसेंबर २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...