Wednesday, July 8, 2020

राजगृह

पुस्तके नाही वाचली की दगडं हातात येतात. आपल्या हातात दगडे उचलण्याची वेळ येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी पुस्तकाचे घर उभा केले. बाहेरून दगडे मारणार्यांनी आत जाऊन त्या राजगृहातले एखादे पुस्तक जरी वाचले असते तरी जगण्याची दिशा सापडली असती पण साला तुमचा मेंदूच सडका होता त्याला कोण काय करणार. आज बाबासाहेब असते तर म्हणले असते "अरे एवढ्याशा दगडांनी काय होणार आहे, जावा आणखीन मोठं मोठी दगडे घेऊन या त्या सगळ्यांना एकत्र करून मी अजून एक पुस्तकांचे घर बांधीन तुमच्या लेकरांसाठी, जे वाचून ते शिक्षित आणि सुसंस्कृत होतील आणि मग तुमच्यासारखे हे असे हल्ले करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही" अरे माथेफिरूंनो दगडांनी पुस्तके फुटत नसतात रे. राजगृहवरील हल्ल्याचा निषेध.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

No comments:

Post a Comment

आरोग्यदायी तुकाराम

​ दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या  धडक कारवाईमुळे शक्य ...