Monday, May 24, 2021

Ban Renaissance State

Author Girish Kuber's rudeness is revealed on the cover of the book 'Renaissance State'. Shivaraya's sword was used to destroy the wicked, to challenge the Mughal sultanate, to protect the very poor, and to raise it to the sky. But In this cover Chhatrapati Shivaji Maharaj's sword is shown leaning on the ground. It's shameful. I think This is done consciously by Author. Many may not realize this but I am also an artist and writer so I can identify the mentality behind a picture.

Mr.Kuber, being the editor of a famous News paper does not mean that you have wisdom. If you have In any case, in the absence of any strong evidence, you would not have been so arrogant as to write a false text in the book, 'Chhatrapati Sambhaji Maharaj murdered Soyara Maharani Saheb'. Your writings on other topics may be famous and so on, you may have made many headlines but in this book you have given wrong information.

Originally very few English books have already been printed on Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj. It was thought that Girish Kuber's book in English would help English readers to understand the history of their king. But taking advantage of the fame of Chhatrapati Shivaji Maharaj's name, you painted a different picture. Hey, our Marathi people already reads less English literature. There was some hope when we heard that Kuber's scholarly book was published but you did not just get confused, but you cheated.

We have no objection to the other texts in this book. There may be some good things in it, but as a devotee of Chatrapati sambhaji Maharaj, we will never tolerate the false accusation of motherhood against Chhatrapati Sambhaji Maharaj. Mr.Kuber should publish a new edition excluding controversial parts from his book & There is disrespectfully mention of both Maharajas of Swarajya in the whole book, one should try to write 'Chhatrapati' before their names otherwise, the same writing that made you a hero will make you a villain.


Vishal Garad
Date : 24 may 2021

Sunday, May 23, 2021

खोटारडं Renaissance state

लेखक गिरीश कुबेरांचा खोडसाळपणा 'रिनायसन्स स्टेट' या पुस्तकाच्या मुखपृष्ठातच उघड होतो. दुर्जनांचा विनाश करणारी, मुघली सल्तनतला आव्हान देणारी, गोर गरिबांचे रक्षण करणारी आणि आभाळाकडे उंचावलेली शिवरायांची तलवार जेव्हा त्यांनी जमिनीवर टेकवलेली दाखवली तेव्हाच त्यांच्या डोक्यातल्या असूया बाहेर पडल्या. काहीतरी नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ करण्याच्या नादात त्यांनी महाराजांचा अभाळाएवढा पराक्रम जमिनीवर टेकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय. कित्येकांच्या हे लक्षात पण येणार नाही पण मीही एक चित्रकार, कलाकार आणि लेखक आहे त्यामुळे एखाद्या चित्राच्या मागची मानसिकता ओळखू शकतो. खरं तर हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच मला शंका आली होती की यात वादग्रस्त मजकूर असणार आणि अंदाज खरा ठरला.

गिरीशजी, तुम्ही एका प्रसिद्ध दैनिकाचे संपादक आहात म्हणजे तुमच्याकडे शहाणपणा असेलच असे नाही. असला असता तर कसलाही प्रबळ पुरावा नसताना 'छत्रपती संभाजी महाराजांनी सोयरा महाराणी साहेबांचा खून केला' हा धाधांत खोटारडा मजकूर तुम्ही पुस्तकात लिहिण्याचा अतिशहानपणा केला नसता. इतर विषयावरचे तुमचे लिखाण प्रसिद्ध वगैरे असेलही, तुमचे कित्येक अग्रलेखही गाजले असतील पण या पुस्तकाच्या बाबतीत मात्र एका विशिष्ठ वर्गात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची होती हे स्पष्ट झालंय.

मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आधीच खूप कमी इंग्रजी पुस्तके छापली गेली आहेत. त्यात गिरीश कुबेर यांचे इंग्रजी पुस्तक येतंय म्हणल्यावर आपल्या राजाचा इतिहास  इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे वाटले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या नावाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन तुम्हाला दुसरेच चित्र रंगवायचे होते हे माहीत नव्हते. अहो आधीच आपला मराठी माणूस इंग्रजी साहित्य कमी वाचतो, त्यात कुबेरांचे अभ्यासपूर्ण पुस्तक येतंय म्हणल्यावर जरा आशा होत्या पण तुम्ही नुसता भ्रमनिरासच नाही तर घात केलाय शिव शंभू भक्तांचा.

सदर पुस्तकातील इतर मजकूरावर आमचा आक्षेप नाही. यात काही चांगल्या गोष्टीही असतील पण छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला मातृहत्येचा खोटा आरोप एक शिवभक्त या नात्याने आम्ही कदापी खपवून घेणार नाही. या पुस्तकातून चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे या विचारांती कुबेरांनी त्यांच्या या पुस्तकातून वादग्रस्त भाग वगळून नवीन आवृत्ती प्रकाशित करावी, संपूर्ण पुस्तकात  स्वराज्याच्या दोन्ही महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्यांच्या नावाआधी 'छत्रपती' लिहिण्याचे कष्ट घ्यावे. अन्यथा ज्या लेखणीने तुम्ही हिरो झालात तीच लेखणी तुम्हाला व्हिलन ठरवेल. 

विशाल गरड
दिनांक : २३ मे २०२१

Saturday, May 22, 2021

दिठी - चित्रपट समीक्षण

आश्विनी परांजपे यांनी "विशाल, हा चित्रपट आजच बघ आणि मला जीवनाबद्दल तुला काय वाटते ते कळव असे सांगितले." मग काय मी देखील तितक्याच उत्सुकतेने सुमित्रा भावे कृत आणि डॉ.मोहन आगाशे निर्मित 'दिठी' हा मराठी चित्रपट सोनी लिव्ह वर पाहिला. एवढा सुंदर चित्रपट पाहायला सुचवल्याबद्दल पहिल्यांदा अश्विनीचे आभार मानतो.

काळ्या कागदावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने चित्र रेखाटावी अशी जिवंत सिनेमॅटोग्राफी डोळ्यांची बाहुली सुद्धा हिकडं तिकडं हालू देत नव्हती. प्रत्येक फ्रेम जणू काळजावर छापणारी; अर्थात सुमित्रा भावेचा चित्रपट म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या कलाकृतीचा आत्माच असतात. विशेष करून प्रकाश यंत्रणा आणि ध्वनीमुद्रनावर त्यांचे असलेले प्रेम सतत अधोरेखित होत राहतं.

रामजीची भूमिका साकारलेले किशोर कदम यांनी डोळ्यांनी बोललेले डायलॉग अंगावर काटा आणतात. दिलीप प्रभावळकर, गिरीष कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, कैलास वाघमारे, ओंकार गोवर्धन, उत्तरा बावकर आणि अंजली पाटील या सर्वांचा अभिनय पडणाऱ्या पावसाएवढा निर्मळ झालाय. तसेच गार्गी कुलकर्णी, धुमाळ काका, देविका दफ्तरदार यांच्या काही सेकंदाच्या भूमिकेनेही प्रभाव टाकलाय. सुनिल वडकेंनी अप्रतिम कॅलिग्राफी केलीय. चित्रपटाच्या सर्व विभागाच्या टिमने चोख कामगिरी बजावली आहे.

"आसच कर्तृत हाय देवाचं, एकएकट्याला गाठून मारतंय आन एकएकट्यालाच देतंय जनम"."तरी बरंय देवाने माणसाला इसराळू केलंय, नाहीतर जन्मभर फाटलेल्या पतंगाचं दुःख इसरलं असतं काय ?"
जोशी बुवा, गोविंदा आणि संतु वाणी यांचा पडत्या पावसातला हा संवाद लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे दर्शवतो. "तू कशाला लुडबुड करतो रं मदी, जाऊन बस की तिकडं वळचणीला" शिवाने कैलासला बोललेल्या या एका वाक्यात 'घरी दारिद्र्य असले तरी अस्पृश्यता डोक्यातून जात नाही' हा विचार नकळतपणे गडद होऊन जातो. सगुणेच्या पोटाला कान लावून तिच्याशी संवाद साधताना रामजीने अख्या आकाशगंगेची फिलॉसॉफी समजून सांगितली आहे. 'जनम असाच असतो मरणाला शिवून येणारा' या वाक्यात जन्म मृत्यूचा परस्पर घनिष्ठ संबंध व्यक्त केलाय. शंकर पार्वतीने दिलेल्या इच्छापूर्ती मणीकडे पारुबाई स्वतःसाठी पंचपक्वान, सोने-नाणे आणि लुगडं मागते, सगुणेला कालवडच व्हावी अशी इच्छा ठेवते यातून माणवाची स्वार्थी वृत्ती ठळक होते. मग संबंध विश्वासाठी मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर कुठे आणि आजचा माणूस कुठे ? याचे उत्तर सहज मिळून जाते.

अवघी अकरा माणसे आणि तीन प्राणी घेऊन एका कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या जगण्याच्या अनुभवातून हा जगाचा उत्सव कसा साजरा केला पाहिजे याचे सार 'दिठी' मध्ये मांडले आहे. दुःखावर अध्यात्म कसे औषध म्हणून काम करते, ढस ढसा रडल्यावर कसे दुःख कमी होते आणि आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखाची उत्तरे कशी पोथी मध्ये सापडतात हे दिठी मध्ये अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ चित्रपटातुन सांगण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.

या चित्रपटातले सगळे कलाकार मुळातच अभिनयाचे बाप आहेत आणि या संपूर्ण कलाकृतीची आई म्हणजेच सुमित्रा भावे आहेत. आज सुमित्रा ताई हयात असत्या तर हे माझे मोडके तोडके पसाभर शब्द नक्कीच त्यांच्या पदरात टाकले असते. माझे निरीक्षण हाच माझा शिक्षक आहे. सुमित्रा भावेंचा सहवास लाभला नाही पण त्यांच्या अजरामर कलाकृतीतून मला खूप काही शिकायला मिळतंय भविष्यात माझ्या कलाकृतीतही जेव्हा सुमित्रा भावेंच्या दिग्दर्शनाची झलक दिसेल तेव्हा समजून जायचे आईची छबी लेकरात दिसायली म्हणून. सुमित्राजी तुम्ही शरीराने गेलात आम्ही तुम्हाला कलेतून जिवंत ठेवुत.

दिठी पाहून मला उमगलं की,
जन्माला कुठं आन् काय म्हणून यायचं, कुठवर जगायचं आणि कधी मरायचं हे आपल्या हातात नसतं. आयुष्य जसं क्षणभंगुर आहे तसंच दुःख देखिल क्षणभंगुर असतं तेव्हा दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा गमावलेले सोडून जे शिल्लक राहिले त्यासोबतच जगण्याचा उत्सव साजरा करायचा. सुख दुःख योग्य वेळी पचवता आलं की प्रत्येकाचे आयुष्य सुंदर होतं. आज मावळलेलं तांबडं उद्या  पहाट म्हणून उगवतं.

विशाल गरड
दिनांक : २२ मे २०२१

Friday, May 14, 2021

ही वेळ निघून जाईल

दुधात मिठाचा खडा पडावा आणि क्षणात दूध नासावं तसं गेल्या महिनाभरात सभोवतालचे वातावरण नासले आहे. अनेक जवळचे नातेवाईक कोरोनामुळे गमवावे लागले. अजूनही काहीजण हॉस्पिटलमध्येच ऍडमिट आहेत. एखादा दिवस अपवाद वगळता रोजच कुणी ना कुणी पॉझिटिव्ह निघाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. वेळीच निदान करणारे घरी क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत तर ज्यांनी दुखणे अंगावर काढले त्यांच्यासाठी बेड आणि इंजेक्शन मिळवता मिळवता नाकी नऊ येत आहेत. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकजण अनुभवतो आहे. आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा व्हेंटिलेटरवर असते तेव्हा आपल्या मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल जणू यम देवाचा निरोप वाटू लागतो. मातीला जाणे, सावडायला जाणे, दहाव्याला आणि तेराव्याला जाणे हे जणू रोजची रुटिंग झाली आहे.

सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक येत असतात तो मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आजचे दिवस जरी दुःखाचे असले तरी सुखाचे दिवस पुढे वाट पाहत असतील हेच सांगून स्वतःच्या मनाची समजूत घाला. गमावलेल्या माणसांच्या स्मृती जिवंत ठेवा आणि काळजी घेऊन स्वतःलाही जिवंत ठेवा. निष्काळजी करून परत धावाधाव करण्यापेक्षा काळजी घ्या, आजार अंगावर काढू नका. ताप आणि अंगदुखी असतानाही जर टेस्ट करायला उशीर केला तर मग तुम्ही यमदेवाच्या टप्प्यात आलेच म्हणून समजा. रोगराई आली की गोळ्या, सलाईन, इंजेक्शन, लस हे औषधे म्हणून वापरली जातात पण जेव्हा काळंच वाईट येतो तेव्हा 'वेळ' हेच सर्वात प्रभावी औषध असतं पण त्यासाठी किंमतही तितकीच मोठी मोजावी लागते जी आपण मोजली आहे. निसर्ग जसा रागावतो तसाच प्रेमही करतो तेव्हा खात्री बाळगा 'ही वेळ निघून जाईल.'

विशाल गरड
दिनांक : १४ मे २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...