Monday, February 12, 2018

विचारांची शिवजयंती ©

रोज नवे गांव आणि रोज नव्या गर्दीत पेरायचंय शिवचरित्र परंतु जे गर्दीला अपेक्षीत आहे ते नाही तर जे मला अपेक्षीत आहे ते.
यंदाच्या शिवजयंतीला सामोरे जात असताना शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थीक सुबत्तेचे धोरण, हे सर्व सांगण्यावरच मी जास्त भर देणार आहे. तसेच शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही आणि ईतिहासतज्ञ देखील नाही. मी तर स्वतःला फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करणारा एक सर्वसामान्य वक्ता समजतो. शिवचरित्र अभ्यासताना अखेरपर्यंत विद्यार्थीदशेतच राहणे मला पसंद राहील. महाराजांच्या विचारांवर प्रेम करणारा व त्यांच्या विचारांचे शब्द गर्दीच्या डोक्यात पेरणारा एक शेतकरी म्हणून हा संपुर्ण महिना दिवसभर वाचन, चिंतन, मनन आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. आता फक्त तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या प्रतिक्षेत...
जय भवानी जय शिवाजी !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१८



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...