Tuesday, August 21, 2018

पुरग्रस्तांना मदत

बॅण्ड बाजा बारातीला फाटा देऊन साखरपुड्यातच लग्न केल्याने त्यासाठीची रक्कम केरळ येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून पाठवतोय. स्वतःच्या क्षणिक आनंदापेक्षा गरजवंतांचे आणि पुरग्रस्तांचे अश्रू पुसणे मला जास्त महत्वाचे वाटतंय. माझा संसार सुरू होत असताना दुसऱ्यांचा संसार उभा करण्याचा विचार मला जास्त आनंद देणारा आहे.

तिथेही माझ्यासारखंच नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असेल अशा पुर परस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल. त्यांच्यावर काय बीतली असले याची जाणिव असल्यानेच मी हा मदतीचा निर्णय घेतला. खरंतर हे लग्नादिवशीच ठरवलेलं परंतु लग्नानंतरच्या कार्यक्रमांमुळे शक्य झालं नाही आज मात्र हातातलं काकण सोडल्या सोडल्या गावातल्या पोस्टात जाऊन मदतीचा चेक केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयात पाठवला.

जे कमावण्यासाठी सगळं आयुष्या खर्ची पडलेलं असतं ते एका क्षणात पाण्यात बुडुन गेल्यावर काय यातना होत असतील याची कल्पनाच करवत नाही. आपली दहा रूपयाची नोट जरी चुकुन पाण्यात भिजली तर तीला वाळवण्यासाठीचा आपला आटापिटा त्या दहा रूपयाची किंमत दर्शवतो पण ईथे तर अख्खे संसारच पाण्यात गेलेत तेव्हा अशांना सावरण्यासाठी आमच्या संसारातला एक घास पुरग्रस्तांसाठी द्यावासा वाटला. ईतरांच्या संसाराचं हित चिंतलं की आपला संसार आपोआपच सुखी होऊन जातो अशी माझी भावना आहे म्हणूनच हा अट्टाहास.
निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या केरळवासीयांना या दुःखातुन सावरण्याचे बळ मिळो एवढीच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक - विशाल गरड
दिनांक - २१ ऑगस्ट २०१८




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...