Wednesday, November 23, 2022

प्रेसिडेंट

मी जरी मोटिवेशन द्यायला इकडे तिकडे व्याख्यानाला जात असलो तरी आम्हाला जिथून मोटिवेशन मिळतं ते विद्यापीठ माझ्या शेजारी उभं आहे. हे आहेत आमच्या संस्थेचे अध्यक्ष सोनवणे सर. सरांनी एकसष्ठी पार केली आहे पण ते फक्त अकड्यापूरतीच, कारण माझ्यापेक्षा वयाने दुप्पट असणारे सर त्यांच्यासोबतच्या सहवासात मात्र समवयस्क वाटतात. म्हणतात ना माणसाच्या शरीराचे वय कितीही वाढले तरी मनाने नेहमी तरुण राहायला हवे अगदी तसेच आहेत माझे बॉस.

आमच्या डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या लातूर, उक्कडगाव, पुणे आणि धारशिव अशा चार शाखांना एकमेकांशी कनेक्ट ठेवायला सरांचा प्रवास सुरु असतो दिवसाकाठी आजही रोज किमान दोनशे किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतो. आमच्या शेकडो प्राध्यापकांचं आणि हजारो विद्यार्थ्यांचं हे प्रेरणास्थान याही वयात आमच्यासोबत चिरतरुण बनून राहतं मग अशा व्यक्तिमत्वाच्या छत्र छायेखाली आम्हालाही बहुआघाड्यांवर काम करण्याची शक्ती मिळते.

जगाच्या पाठीवर अनेक शिक्षण संस्था आणि संस्थापक असतील पण सोनवणे सरांनी जी तत्व बाळगून संस्था सुरू ठेवली आहे ती एकमेवाद्वितीय आहे. अनेक चाके असलेला हा कॉलेजरूपी रथ सरांच्या सारथ्यामुळे यशस्वी घोडदौड करत करत नव नवे उच्चांक प्रस्तापित करतोय. ते जेव्हाही येतात, भेटतात, खांद्यावर हात टाकतात, पाठीवर थाप टाकतात, आपुलकीने चहा पाजतात तेव्हा आमच्यात एनर्जी भरून जातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे "बस्स यही है हमरी सरकार."

प्रा.विशाल गरड
२३ नोव्हेंबर २०२२, सोनवणे कॉलेज, उक्कडगांव



Friday, November 18, 2022

लावणीवरचं अतिक्रमण गौतमी

गावा गावातल्या पोरांमधी गौतमीची क्रेझ हितकी शिगंला पोहचल्याली हाय की पर्वा एक जण म्हणाला "चार म्हशी इकीन पण गौतमीला एकदा तरी गावात आणीनच." कसली ही हवा, कसलं हे येड, कसला ह्यो जलवा, आरं.. आरं..आरं.. जाळ धुर संगटच. अंगावर लावणीचा शृंगार चढवलाय खरा पण त्यातून बिभत्स रसच जास्त ओसंडून वाहतंय म्हणूनच कार्यक्रम बघून आलेली पोरं रात रात झोपणात. जे फकस्त मम्बईतल्या डान्स बारमदी बघाया मिळत व्हतं ती आज गौतमीमुळं खेडो पाड्यातील चौकात बघायला मिळायलंय. गर्दी मोक्कार जमती, पार चेंगराचेंगरी व्हायचा वकुत येतंय म्हणल्यावर स्पॉन्सरची पण मुरकंड पडायली. त्या डॉल्बीच्या साऊंडवर कोण नाचणार ? 'ना तुम्ही ना आम्ही तिथं फक्त गौतमी.'


सध्या बेरोजगारी इतकी भयानक टोकाला गेलीये की लग्नाचं नावबी काढलं तर नोकरी, जमीन, बंगला असल्याशिवाय स्थळं येईनात. अशात गावागावात पंचवीशी, तिशीतल्या पोरांच्या फौजा तयार झाल्यात. काही आहेत विचारी, इमानी, कष्टाळू, होतकरू पण काही आहेत बापाच्या आणि नेत्याच्या जीवावर एंटरटेनमेंटची भूक भागवणारे. गौतमीनं चार भिताडाच्या आतला डान्सबार रस्त्यावर आणला. तिच्या शृंगाराला भुकेले जीव आंघोळीचे पाणी तिर्थ म्हणून प्यायला सज्ज आहेत. आधीच किशोरवयीन पोरांना मोबाइलने पॉर्नोग्राफीच्या मगरमिठीत वेढले असतानाच जर आता लावणी सारख्या नृत्याची आणि पोशाखाची मोडतोड करून त्यातून अश्लील हावभाव आणि अंगप्रदर्शनाचा खेळ खुलेआम होणार असेल तर सुसंस्कृत महाराष्ट्राला हे अभिमानानं मिरवण्यासारखं नक्कीच नाही.


तिचं ते केस उडवनं, अंगावर बाटली ओतून घेणं, पदर काढून तो आभाळात भिरकावणं, हात आणि डोळ्याचा वापर करून बिभत्स हावभाव करणं हे सोडून तिच्या नृत्यातला बाकीचा भाग कौतुकास्पद आहे. तिची अदाकारी, तिची डेरिंग, सौंदर्य अफाट आहे. सध्या ती बंदुकीतल्या गोळीच्या वेगाने गाजतेय पण जर वेळीच तिला योग्य दिशा नाही मिळाली तर या क्षेत्रातलं अमरत्व तिच्या वाट्याला येणार नाही. चेहऱ्यावर थोडया सुरकुत्या पडल्या की खेळ आपसूकच गुंडाळला जाईल. मी काही कधी गौतमीच्या शोला गेलो नाही पण मोबाईलवर सहज जरी फेसबुक इन्स्टाचे रील बघत बसलो तरी त्यात पाच पन्नास रिल्स गौतमीचंच दिसत्यात म्हणून मग व्यक्त व्हावं वाटलं.


इथं नाचणारी गुन्हेगार, का तिच्या सोबत नाचणारे गुन्हेगार, का तिला नाचायला बोलावणारे गुन्हेगार आहेत ? माहीत नाही. पण ज्या राजाने त्यांच्या दरबारात असे नाच गाण्याचे शौक फर्मावले नाहीत त्याच राजाच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या राज्यात आयोजित होत असलेले हे शौक महापुरुषांच्या विचारांना छेद देणारे आहेत. उद्या यातल्या काही पैशाने गबरगंड असलेल्या तथाकथित अनुयायांनी जयंत्यांना वगैरे असे कार्यक्रम आयोजित करू नये म्हणजे मिळवले.


डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा करंट नेमका कुठं लागतोय त्याने कोणता अवयव सुखावतो किंवा बावचळतो यावर त्या कलेचे परीक्षण होऊ शकते. हे जर चार भिंतींच्या आत होत असलं असतं तर लिहिण्याचं काही कारण नव्हतं पण हे सार्वजनिक स्थळी घडतंय म्हणून सार्वजनिक लिहावं लागतंय. बाकी पटलं तर घ्या नाहीतर वाचून सोडून द्या. गौतमीला शुभेच्छा.


विशाल गरड

१८ नोव्हेंबर २०२२, पांगरी




Wednesday, November 9, 2022

Dear Rahul Gandhi

Struggle is important in everyone's life. Now you are on the right way of success. I always like your  never give up attitude though you are criticized by your oppositions as pappu & all. But you show us your intellectual power by your behaviour & now you are showing your physical strength through the Bharat Jodo yatra. Salute to you man !

Sometimes, I didn't like your way of speech before. But we are human not God. Made mistakes, correct it & go ahead but never stop. One day a big success is waiting for you. In future if you beat Modiji then this is your biggest history. You won the people in your own way not by the parent's work. That's why now you are on the right track. Afterall your grand mother's & father's blood will never be underestimated by Indians but now it's a time to use your blood to refresh your ancestors history. 

I am not a blind supporter of Prime Minister or Rahul also. It's just an opinion as a voter of this country. 'Jo garibo ke liye ladhega wo raja banega jo raja jaisa banke rahega wo ek din garib banega' it's karma chakra. You walk on the village roads, city roads, gullys & vallys one day you will walk on red carpet if you don't return to your past then red carpet will drag from your feet by voters.

I respect our Prime Minister. It not means that I hate Rahul. Both has its own strengths I like both in different ways & that's my culture. Yet I am not in politics but I have right to choose politician so this is the most powerful thing for everyone. Leader never born in mom's womb, so Rahulji you are walking through your mom's womb called Bharat Mata. If your views & aspects are true then destiny will give you a big success ahed.

How much we study and how much we learn when we walk among people.This is what I wrote in my 'Rayari' novel which was published in February 2022. According to that when you will get success? I don't know but I am sure you will win one day definitely. All the best Rahulji. Keep struggling.

Vishal Garad
Writer & Orator | 9 Nov 2022 | Pangri

Saturday, November 5, 2022

साहेब, काळजी घ्या !

जुन्या पिढीतील राजकारणी म्हणून ज्यांनी सर्वाधिक निवडणूका अनुभवल्या असे देशात आपण एकमेव पुढारी आहात. वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी तुम्ही पक्षासाठी घेत असलेले कष्ट कुणालाही प्रेरणा देणारेच आहे. अशात आपण आजारपणातही करीत असलेले दौरे जरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत असले तरी ते तुमच्या स्वतःच्या शरीर स्वास्थासाठी दगदगीचे असतात. जिथं ऐन एकविशी पंचवीशीतली पोरं सुद्धा हल्ली थकवा येतो म्हणून रेड बुल वगैरे पिऊन एनर्जी मिळवतात तिथं तुमच्या सारखी माणसं या वयातही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट एनर्जीने उभे राहतात ही साधी गोष्ट नाही.

तुमचे कट्टर राजकिय शत्रूही खाजगीत तुम्हाला प्रचंड मानसन्मान देतात. मुळात तुमचं वलय एखाद्या पक्षापुरते मर्यादित नसून सर्वच पक्षातील लोक तुम्हाला मानतात. टिका टिपण्ण्या, विचार सरणीचे हेवे दावे, आरोप प्रत्यारोप राजकारणाचा अविभाज्य भाग आहेत. ते झालेत, होत आहेत आणि पुढेही होतच राहतील. पण खरंच सांगतो साहेब मी ना कुण्या पक्षाचा कार्यकर्ता, ना नेता आहे पण एक सामान्य माणूस म्हणून आपल्यासारख्या बुजुर्ग नेत्याला वयाच्या शंभरीहुन अधिक आयुष्य लाभावे हीच आमची इच्छा आहे. ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचनारही नाही कदाचित कारण सगळीकडे तर तुम्ही आजारी असताना शिर्डीला उपस्थित राहिल्याचा जणू विजयोत्सवच साजरा केला जात आहे आणि करावाही. मलाही तुमच्या अशा कृतीचे आजवर कौतुकच वाटत आले आहे पण साहेब, तुम्हाला असे हाताला पट्ट्या, पायाला बँडेज लावलेलं पाहिलं की आता तुम्ही प्रकृतीची काळजी घायला हवी अशी भावना आपसूकच मनात दाटते.

सुप्रियाताई, सध्या साहेबांच्या सर्वात जवळ तुम्ही आहात तेव्हा आजारपणात वगैरे साहेबांनी दौऱ्यावर जाणे, प्रवास करणे कटाक्षाने टाळायला लावण्याचा आग्रह फक्त तुम्हीच त्यांच्याकडे करू शकता. ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा वगैरे गोष्टी लिहिताना विशेषण म्हणून ठिक आहेत पण शरीराच्या अवयवांवर त्याचा प्रभाव पडत नाही. मुळात माणसांना भेटणे हेच साहेबांचे खरे टॉनिक आहे ज्याच्या जोरावर त्यांनी दुर्धर आजारांवर सुद्धा विजय मिळवलाय पण वाढत्या वयात साहेबांनी थोडी दगदग कमी करावी. राजकारण राजकारणाच्या जागी सोडा पण जर आपल्या घरातले आजोबा आजारपणातही फिरत असतील तर कुटुंबातला एक सदस्य या नात्याने त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मग महाराष्ट्र नावाच्या कुटुंबातला हा एक सदस्य आजारपणाची तमा न बाळगता याही वयात न थकता, न दमता काम करतोय म्हणून त्यांना प्रेमपूर्वक विनंती करावीशी वाटते "साहेब, काळजी घ्या"

नेते कुणा एकाचे नसतात त्यांनी त्यांच्या कार्यातून सर्वच जनतेवर प्रभाव टाकलेला असतो तेव्हा त्यांना काळजी घ्या म्हणायचा अधिकार प्रत्येकालाच प्राप्त होतो, त्याच अधिकारातून हा लेखप्रपंच केलाय. बाकी पोस्ट निव्वळ अराजकीय आहे. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राजकिय कमेंट टाळाव्या आणि या पोस्टकडे सहानुभूतीने पाहावे ही विनंती.

विशाल गरड
५ नोव्हेंबर २०२२, पांगरी

Wednesday, November 2, 2022

आरं आरं महादेव

हेडिंग वाचून कसंसं वाटलं ना, पण मी 'हर हर महादेव' पाहिल्यानंतर माझ्याही तोंडून हेच शब्द निघाले "आरं.. आरं.. महादेवा, माझ्या राजाच्या इतिहासाचं हे काय करून ठेवलंय यांनी" शिवकालीन मावळे खूप अस्सल लढले ओ पण या कमर्शिअल फिल्मच्या जमान्यात अलिकडील काही दिग्दर्शकांनी त्या मावळ्यांना पार अवेंजर्सचे रूप दिलंय. हर हर महादेव चित्रपटातल्या घोडखिंडीत झालेल्या लढाईत तर जेव्हा एक गनीम हातोडा हातात घेऊन येताना दिसला तेव्हा तर मी डोक्यालाच हात लावला. स्क्रिप्ट लिहिताना लेखकाच्या मागे काय त्या थायनॉसचं भूत लागलं होतं की काय ? का झोपताना हॉलीवूडचा रॉंग टर्न पिक्चर बघितला होता म्हणून शेवटी गनीम कमरेतून कापलेला वगैरे दाखवलाय. अरे एवढीच खुमखुमी होती हॉलिवूडचा टच द्यायची तर मग एखादे काल्पनिक पात्र रंगवायचेना, त्यासाठी ज्यांचा इतिहास आणि पराक्रम फक्त इथल्या मातीच्या कनांवरच नाही तर प्रत्येक मराठ्यांच्या मनामनांवर रुजला आहे त्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच अशा कलाकृती का ? 

अबे फायटिंग आणि युद्ध यात फरक असतो रे हे का नाही लक्ष्यात येत. आणि बाजीप्रभूंनी 'खिंड' लढवली होती 'दरी' नाही. बिग बजेट चित्रपट असतानाही खापटाची दरी उभारून त्यात पाच सहा ट्रॅक्टर वाळू ओतून त्यावर शूटिंग केलीये हे लैच नाट्यमय वाटतंय. दुसरं महत्वाचं म्हणजे मराठा हा शब्द मराठीला सिनिअर आहे. मुळात मराठा शब्दाची व्याप्ती शिवकाळात एवढी मोठी होती की त्यात मुसलमान सुद्धा गणले जायचे. मुळात तो एक समूहवाचक शब्द होता त्याचे जातीत रूपांतर अलीकडे झाले हे ध्यानात घ्या. पण महाराजांची भूमिका साकारणाऱ्या नटाच्या तोंडून 'मराठा' शब्दाला 'मराठी'ने रिप्लेस करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं होतं ? 

शस्त्र तयार करणाऱ्या लोहाराकडे महाराज संन्याशाच्या पेहरावात जायचे काय ? अफजल्याने महाराजांच्या डोक्यात कट्यार घुसवली होती काय ? शिवछत्रपतींचे डोळे, नाक, कान, दाढी मिशा याबद्दल सविस्तर वर्णन उपलब्ध असताना त्यांच्या जवळपासही न दिसणाऱ्या नटाला ही भूमिका देण्यामागची काय बरे मजबुरी असावी ? अहो आम्ही चार दोन पुस्तकं वाचलीत म्हणून एवढे तरी विचारतोय पण ज्यांना महाराजांचा इतिहास माहित नाही त्या परभाषिक लोकांवर तुम्ही चित्रपटातुन छापलेलं आता कसं पुसायचं ? का तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही कायपण करत बसायचं ?

महाराजांच्या गळ्यात जशी कवड्याची माळ तसेच कपाळी चंद्रकोर आणि शिवगंध असायचा चित्रपटात मात्र महाराजांच्या कपाळी फक्त एक नामाटी दाखवली. बाजीप्रभूंची भूमिका साकारलेल्या नटाचे डायलॉग पाठ केल्यासारखे वाटतात. काही सिन गडावर शूट केल्याने त्यात जिवंतपणा आलाय. सिनेमॅटोग्राफी आणि बिजीएम उत्तम झालंय. उपभूमीका साकारणारी सगळीच पात्र सपकल बसली आहेत त्यांची वेशभूषा आणि अभिनयही तितकाच सरस झालाय त्या सर्वांचे कौतुक पण मुख्य भूमिका साकारणारी पात्रच गंडली आहेत हे दुर्दैव.

बाजीप्रभूंच्या पराक्रमाला हर हर महादेवच्या तुलनेत पावनखिंड चित्रपटात बऱ्यापैकी न्याय दिलाय. हर हर महादेवच्या लास्ट फ्रेम पेक्षा पावनखिंड चित्रपटात दगडाला टेकून निपचित पडलेले बाजीप्रभूंची फ्रेम आणि त्यामागे हळुवारपणे उमटणारे  'श्वासात राजं रं.. ध्यासात राजं' हे बीजीएम हजार पटीने सुंदर वाटतं. इथे मला तुलना अजिबात करायची नाही पण एक श्रोता म्हणून जे अनुभवलं ते जसंच्या तसं इथं लिहावं वाटलं म्हणून ती आपसूकच झाली.

मुळात चुका दाखवण्याचा माझा स्वभाव नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना त्याच्या काय गर्भकळा असतात, किती टिम एफर्ट असतो, शूटिंग, एडिटिंग करताना किती कष्ट असतं हे मी जाणतो म्हणूनच मी कधी फारसं निगेटिव्ह लिहितही नाही. पण इथे विषय शिवछत्रपतींचा असल्याने त्यांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यात आपल्या सोयीने डायलॉग घुसवणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच विरोध झाला पाहिजे म्हणून एक शिवभक्त या नात्याने माझा हा लेखप्रपंच.

आता लगेच माझा हा लेख वाचून खरंच असं झालंय का हे बघण्यासाठी थेटरात जाऊन हा चित्रपट पाहू नका. मग यावर तुम्ही म्हणाल "आम्हाला सांगताय मग तुम्ही का पाहिला ?" तर  मीही पाहणार नव्हतोच पण आमच्या काही मित्रमंडळींनी यात भूमिका साकारल्याने त्यांच्या खातर मी हा सिनेमा पाहायला गेलो पण पाहून आल्यावर माझ्या मेंदूवर शिवरायांच्या विचारांचा पगडा असल्याने माझ्यातल्या लेखकाला जणू त्यांनीच आदेश दिला आणि हे समदं हितं टायपिलं गेलं. फिरू द्या आता हे आपल्या स्वराज्यात.

विशाल गरड
२ नोव्हेंबर २०२२, पांगरी

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...