Sunday, July 30, 2023

स्त्रीभ्रूणहत्येची दुसरी बाजू

मुलगी नको या विचाराच्या खोलवर जाऊन त्याची दुसरी बाजू मांडण्याचा एक धाडसी प्रयत्न


मुलगा मुलीकडे नांदायला आला तर ? आयुष्यभर मुलीने नवऱ्याऐवजी बापाचेच नाव लावले तर ? मातृसत्ताक कुटुंब पद्धती पुन्हा सुरूझाली तर ? लग्न करण्यासाठी मुलांनी मुलींना हुंडा दिला तर ? मुली स्वतः कमावत्या झाल्या तर ? मुलीला नवऱ्याच्या प्रॉपर्टी ऐवजी बापाच्याच प्रॉपर्टीतला हिस्सा मिळाला तर ? मुलीला शिकवून तिला नोकरी लागल्यावर तिच्या पगारावर तिच्या बापाचाच हक्क राहिलातर ? आई वडिलांच्या वार्धक्याचा सांभाळ मुलीनेच केला तर ? म्हातारपणाची काठी म्हणून मुलीचाच उल्लेख झाला तर ? वंशाच्या पणतीलाच दिव्याचे स्थान दिले तर ?


समाज म्हणून जर आपण हे सगळं बदलू शकलो तर घराघरात मुलींचे स्वागत अभिमानाने होईलमुलगी नकोच ही मानसिकता मुळासकट संपून जाईलमुलगा होण्याची वाट  बघता सर्वसामान्य घरातील लोकं सुद्धा एका मुलीवर ऑपरेशन करतीलहळू हळू समाजाची पाऊले त्या दिशेने वळायली आहेत हे ही नसे थोडके


आपल्या आई वडिलांच्या काळात सर्रास चार पाच अपत्य असायची त्यात नैसर्गिकरित्याच काही मुले तर काही मुली व्हायच्यासगळ्यांना मावश्यामामा असायचे पण दोन अपत्याचा कायदा झाल्याने आता प्रत्येकाला दोनच चान्स असतात त्यात ज्याला पहिला मुलगा होतो त्याला दुसऱ्या वेळेस मुलगी होण्याची इच्छा असते तर पहिली मुलगी झालेल्यांना दुसरा मुलगा होण्याची इच्छा असतेबहुतांशी दांपत्य एक मुलगाएक मुलगी हे प्रमाणजमले तर नैसर्गिकरित्या किंवा मग गर्भलिंगनिदान करून मेंटेन ठेवतातयात प्रत्येकाची झाकली मुठ सव्वा लाखाची असते.


सलग दोन किंवा तीन मुली झालेल्यांना मात्र आयुष्यभर मुलगा नसल्याची सल मनात ठेवून जगावं लागतंअर्थात ही सल समाजव्यवस्थेने निर्माण केलेली असतेयातही समाजापेक्षा वेगळा विचार करून फक्त मुलीला जन्म देवून समाधानी राहणारे खरे समाजसुधारक ठरतात.  


वरवर कितीही मुलगा मुलगी समानतेच्या गप्पा मारल्या तरी मुळाशी मात्र प्रचंड असमानता आहे हे मान्यच करावे लागेलआपल्या सभोवताली जेव्हा स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना घडतात तेव्हा फक्त तो निर्णय घेणारे पालकच नाही तर समाज सुद्धा तितकाच जबाबदार असतोजसं आत्महत्या करणारा आमक्या तमक्याने प्रवृत्त केलं म्हणून आत्महत्या करतोय असे लिहून ठेवतो तसं जर उद्या स्त्री भ्रूणहत्त्या करणाऱ्या जोडप्याने समाजाने प्रवृत्त केलं असं म्हणलं तर ?


विशाल गरड

३० जुलै २०२३पांगरी




Friday, July 21, 2023

अरे बलात्काऱ्यांनो

 स्त्रीवर अत्याच्यार करणाऱ्या मणिपूरच्या हैवानांसाठी.


जन्मला होतास नागडा जेव्हा,

तिनेच तर बाळुतं झाकलं होतं.

भोंगळ्या देहाला तुझ्या,

तिनेच तर पहिलं कापड आणलं होतं.


विसरलात का रे बलात्काऱ्यांनो,

तुमची बहिण आणि माय.

तुमचं शिश्नच छाटायला हवं,

हाच होईल न्याय


विशाल गरड

२१ जुलै २०२३पांगरी




Thursday, July 6, 2023

द्वंद्व

लेखक असणाऱ्या माणसाच्या देहात अनेक व्यक्ती वास्तव्य करीत असताततो एकाच जन्मात अनेक आयुष्य अनुभवतोत्याच्यातल्या मूळ व्यक्तिवर त्याच्या कुटुंबाचामित्रपरिवाराचानातेवाईकांचा पगडा असू शकतो पण त्याच्यातल्याच इतर अभिव्यक्ती मात्र वाऱ्यासारख्या असतात ज्याला कुणीच वेसण घालू शकत नाहीदेह आईच्या पोटात तयार झाला तरी लेखकाचे मन मात्र मेंदूच्या गर्भात त्याच्या वाचनातूनचिंतनातून जन्माला आलेलं असतंकधी कधी एखाद्या व्यक्तीतला लेखक जेव्हा उत्स्फूर्तपणे व्यक्त होतो तेव्हा त्याच्या मताशी त्याच्यातलाच मू व्यक्तीही सहमत असेलच असे नाहीएखादा विचार किंवा काव्य जन्माला घालताना त्या व्यक्तीतल्या लेखकाने मेंदू आणि हातांचा फक्त साधन म्हणून उपयोग करून घेतलेला असतो.


कधी कधी शब्दांमधे इतका बारुद भरलेला असतो की कुणाच्यातरी बंदुकीतल्या गोळीवरही त्या लेखकाचे नाव लिहिले जाते पण प्रत्यक्षात मात्र ती गोळी देहरूपी लेखकाला मारते पण त्याचा विचार मात्र शब्दरुपी आत्म्याच्या माध्यमातून अजरामर होवून फिरत राहतोचम्हणूनच सशस्त्र सैनिकांचे दले सांभाळणाऱ्या सारस्वतापेक्षाही शब्दांचे सामर्थ्य असणारे योद्धेच अधिक प्रभावशाली असतातज्यांना लिखाण सुचत नाही कवितेची एक ओळ स्फुरत नाही त्यांना मी मांडलेला हा विचार समजून घ्यायला स्वतःमधील लेखक आणि कवीला जन्माला घालावे लागेलमनुष्य देह चौसष्ठ कलांचा अधिपती होवू शकतो त्यासाठीचे अदृश्य शुक्राणू जन्मतः प्रत्येकात असतात गरज असते ती फक्त तेवढ्या ताकदीची कुस निर्माण करण्याची


माझ्या एका शरीरात अनेक व्यक्ती वास्तव्य करतात अर्थात मी प्रयत्नपूर्वक त्यांना जन्माला घातलंयएकाच घरात राहूनएकाच आईच्या पोटात जन्माला येवून सुद्धा जसे लेकरांचे वेगवेगळे विचार असू शकतात तसेच आपण आपल्या शरीरात जागृत केलेल्या लेखकाचेकवीचेवक्त्याचेचित्रकाराचे, दिग्दर्शकाचे असू शकतातहे सगळे एखाद्या गोष्टीवर एकाच वेळी सहमत असतील असे नाहीत्या सर्वांचे पालक म्हणून त्यांनाही विचार स्वातंत्र्य देणे गरजेचेच असते आणि मी त्याचे समर्थन करतोमाझ्या लिखाणावरकवितांवरचित्रांवर आणि व्याख्यानांवर प्रेम करणाऱ्यांचा आणि द्वेष करणाऱ्यांचा मला अभिमान आहेबाकी सोबतच्या फोटोचा आणि रावणाचा काहीएक संबंध नाही असलाच तर त्याच्यातल्या प्रतिभेशी असू शकतोजय हिंदजय महाराष्ट्र


विशाल गरड

 जुलै २०२३पांगरी




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...