आज आमच्या गल्लीतल्या एका शेतकरीकन्येच्या विवाहाप्रसंगी आवर्जुन उपस्थित होतो. त्यांच्या घरासमोरच मंडप टाकला होता. एका गरिब शेतकरी कुटुंबातल्या या मुलीच्या विवाहासाठी मी काॅलेजहून खास वेळ काढून आलो.
शेवटची मंगळअष्टिका झाली की वऱ्हाडाची लगबग जेवणासाठी सुरू झाली आणि काही मंडळी त्याच मंडपात आहेर देण्यासाठी झुंबड करू लागली. कांतीलाल आबा आणि दिपक; आहेर घेण्यासाठी हापश्याजवळच बसले होते. गोरगरिबांच्या लग्नात आहेर स्विकारण्याची तत्परता दाखवणे ही सुद्धा एक सेवाच असते.
काही श्रीमंत मंडळी 'आहेर देणे घेणे नाही' असे अभिमानाने पत्रिकेवर छापतात ते योग्यही आहे परंतु गरिब शेतकरी कुटुंबाच्या अशा लग्नात मात्र आपण आवर्जुन आहेर करायलाच हवा. मुलीच्या बापाने अतिशय काबाडकष्ट करून पै पै गोळा केलेली असते. पोरीच्या सुखासाठी हा शेतकरी बाप त्याच्या आयुष्यातली बहुतांशी मुद्दल खर्च करित असतो अशावेळी आहेर संस्कृतीमुळे त्यांना वऱ्हाडी मंडळींचा थोडाफार आर्थीक हातभार लाभतो.
आजही ग्रामिण भागात लग्नानंतर आहेराची यादी वाचून दाखवण्याची पद्धत असते. कधीकाळी अकरा रूपयाचा आहेर आता महागाईच्या काळात एक्कावन्न रूपयापर्यंत येऊन ठेपलाय अशातही आपला शंभर रूपयाचा आहेर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी कारणीभुत ठरू शकतो. म्हणुनच ज्या लग्नात लाखो करोडोंची उधळपट्टी होते अशा लग्नात आहेर देणे आवर्जुन टाळा पण गोर गरिब शेतकरी जर त्याच्या मुलीचे लग्न करत असेल तर त्या लग्नात आवर्जुन आहेर करा.
एकिकडे अंबानीच्या मुलीच्या लग्नाची एक पत्रिका तीन लाख रूपयाची असते. तर दुसरीकडे पोरीचं लग्न उरकण्यासाठी एक शेतमजूर तीस हजार रूपयावर सालगडी म्हणून वर्षभर काम करत असतो. हेच आपल्या भारताचे खरे वास्तव आहे. गरिबी आणि श्रीमंतीतली ही दरी आपण बदलू शकत नाही फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी केलेली आपली छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य उभा करू शकते हे नक्की.
वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ डिसेंबर २०१८
शेवटची मंगळअष्टिका झाली की वऱ्हाडाची लगबग जेवणासाठी सुरू झाली आणि काही मंडळी त्याच मंडपात आहेर देण्यासाठी झुंबड करू लागली. कांतीलाल आबा आणि दिपक; आहेर घेण्यासाठी हापश्याजवळच बसले होते. गोरगरिबांच्या लग्नात आहेर स्विकारण्याची तत्परता दाखवणे ही सुद्धा एक सेवाच असते.
काही श्रीमंत मंडळी 'आहेर देणे घेणे नाही' असे अभिमानाने पत्रिकेवर छापतात ते योग्यही आहे परंतु गरिब शेतकरी कुटुंबाच्या अशा लग्नात मात्र आपण आवर्जुन आहेर करायलाच हवा. मुलीच्या बापाने अतिशय काबाडकष्ट करून पै पै गोळा केलेली असते. पोरीच्या सुखासाठी हा शेतकरी बाप त्याच्या आयुष्यातली बहुतांशी मुद्दल खर्च करित असतो अशावेळी आहेर संस्कृतीमुळे त्यांना वऱ्हाडी मंडळींचा थोडाफार आर्थीक हातभार लाभतो.
आजही ग्रामिण भागात लग्नानंतर आहेराची यादी वाचून दाखवण्याची पद्धत असते. कधीकाळी अकरा रूपयाचा आहेर आता महागाईच्या काळात एक्कावन्न रूपयापर्यंत येऊन ठेपलाय अशातही आपला शंभर रूपयाचा आहेर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी कारणीभुत ठरू शकतो. म्हणुनच ज्या लग्नात लाखो करोडोंची उधळपट्टी होते अशा लग्नात आहेर देणे आवर्जुन टाळा पण गोर गरिब शेतकरी जर त्याच्या मुलीचे लग्न करत असेल तर त्या लग्नात आवर्जुन आहेर करा.
एकिकडे अंबानीच्या मुलीच्या लग्नाची एक पत्रिका तीन लाख रूपयाची असते. तर दुसरीकडे पोरीचं लग्न उरकण्यासाठी एक शेतमजूर तीस हजार रूपयावर सालगडी म्हणून वर्षभर काम करत असतो. हेच आपल्या भारताचे खरे वास्तव आहे. गरिबी आणि श्रीमंतीतली ही दरी आपण बदलू शकत नाही फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी केलेली आपली छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य उभा करू शकते हे नक्की.
वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ डिसेंबर २०१८
No comments:
Post a Comment