Monday, December 14, 2020

बेताल वक्तव्याचा निषेध

तुमच्या बापाने जेव्हा तुमचे नाव प्रताप ठेवले असेल तेव्हा त्याला संदर्भ नक्कीच प्रतापगडाचा असेल. पण तुमच्या आडनावात 'नाईक' कसे आले हा संशोधनाचा भाग आहे. आता नुसती माफी मागून तोंडाची वाफ घालवू नका, गपगुमान सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर नाक घासा. अर्थात हे तुम्ही कराल का नाही याची शंका आहे, कारण तुमच्यासारख्यांना छत्रपती बद्दलचे प्रेम, आदर, जिव्हाळा हे फक्त निवडून येईपर्यंत महत्वाचे असते, नंतर करोडपतीचा अब्जोपती बनण्याचा धंदा सुरू असतो. तुम्ही किती टर्म निवडून आलात यापेक्षा तुम्ही काय कर्म केले हे जास्त महत्वाचे आहे.

जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तेव्हा राजाधिराज शिवछत्रपतींच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वराज्यासाठी बलिदान दिलेला प्रत्येक मावळा हा वेगळा नसून तो छत्रपतींच्या रक्ताचा थेंब आहे. तुमच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी जरा दुसरी उदाहरणे वापरात जावा आणि इतिहासातील उदाहरणे द्यायची असल्यास जरा अभ्यास करून देत जावा. आज तुमच्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि तो यासाठी महत्वाचा आहे; की उद्या दुसऱ्या कुणीतरी इतिहासातील अज्ञानामुळे असे बेताल वक्तव्य करू नये. बाकी नाईक या शब्दाचे जरी पाईक झालात तरी ती आमदारकी पेक्षा मोठी गोष्ट असेल.

वक्ता तथा लेखक :  विशाल गरड
दिनांक : १४ डिसेंबर २०२०


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...