१००,००००००० प्रति महिना. (शंभर कोटी म्हणजे एकवर नेमके किती शुन्य असतात हे माहीत व्हावे म्हणून असे लिहिले) अरे काय बापाची पेंड आहे काय ? महाराष्ट्राची अर्धी संपत्ती फक्त या बड्या राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बुडाखाली आहे हे आज निदर्शनास आले. सदर आरोप कुणा ऐऱ्या गैऱ्याने नाही तर एका IAS अधिकाऱ्याने केले आहेत त्यामुळे यात काहीतरी तथ्य असेलच. खरंतर प्रत्येक खात्यात या गोष्टी संगनमताने होत असतात, त्या सगळ्यांनाच माहितही असतात पण मग असा एखादा लेखी पुरावा मिळाला की त्यावर शिक्कामोर्तब होते; जे आज झाले.
एकीकडे लॉकडाऊनच्या भितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला घोडा लागलाय आणि यांचा इन्कम बघा. सर्वसामान्य जनतेचे अब्जो रुपये अशा जबराट सिस्टीमने वसूल केले जातात म्हणूनच विकास राज्याचा नाही तर पक्षाचा होत राहतो, सामान्य कार्यकर्ते आणि जनता मात्र फुकटचे उदो उदो करायला उरतात. हे म्हणून हेच नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारे अशीच चालतात, बाकी तुम्ही आम्ही फक्त बटणं दाबण्यापूरतीच. आज यशवंतराव चव्हाण असते तर दोषी राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली असती. लाजिरवाणी आहे सगळं.
विशाल गरड
दिनांक : २० मार्च २०२१
(संदर्भ : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी केलेल्या प्रति महिना १०० कोटी रुपये मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र)
No comments:
Post a Comment