Friday, August 25, 2017

| पर्यावरणपूरक गणोशोत्सव ©

लाहान-लहान अनाथ आणि दिव्यांग असलेल्या मुलींनी तयार केलेला मातीचा गणपती विकत घेऊन देवाचे खरे रूप घरी आणल्याचा आनंद झालाय. उस्मानाबाद जिल्हयातील आळणी पाटीवर असलेल्या स्वआधार मतिमंद मुलींच्या वसतीगृहास सदिच्छा भेट देऊन; या मुलींनी गेल्या दोन महिण्यांपासुन घेतलेल्या कष्टाचे कौतुक करून बाप्पाची मुर्ती घेतली. ऐकीकडे भव्य दिव्य मुर्त्यांसाठी  लाखो करोडो रूपये खर्च करून देव तयार करण्याचे कारखाने उभारले जात आहेत तर दुसरेकडे पर्यावरणपूरक गणपती निर्माण करण्यासाठी हजारो लाखो हात झटत आहेत. बाजार हा मागणी तसा पुरवठा या सुत्रावर चालत असतो. आजवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना आपणच प्रोत्साहन देत आलो म्हणुन लाखो मुर्त्या दरवर्षी पाण्यात टाकण्यास आणि नंतर त्यापासुन होणाऱ्या पाणी प्रदुषणास व मुर्ती विटंबनेस काहीअंशी आपणही जबाबदार आहोत. परंतु आपली श्रद्धा अबाधित ठेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे आपण लक्ष देणे हिच आजची गरज आहे.
आपल्या देशात पर्यावरण रक्षणासाठी अनेक संघटना कार्य करत आहेत. त्या सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहेत; परंतु त्यांच्यावर फक्त कौतुकाची थाप मारण्यापेक्षा निसर्ग संवर्धनासाठी वैयक्तीयपणे टाकलेले आपले एक कृतीशील पाऊलही या चळवळीला बळकटी देईन. सोलापुर मध्येही ईकोफ्रेन्डली क्लब सारख्या संस्था अशा पर्यावरणपूरक उपक्रमासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबवत आहेत. अशा संस्थांना सर्वच स्तरातुन पाठबळ मिळायला हवे तेव्हाच आणखीन हात झटण्यासाठी उभे राहतील.
सरतेशेवटी आपण सर्वजन या पृथ्वीवरचे भाडेकरू आहोत. या सृष्टीचे निर्माते आणि मालक आपण मानलेले देव, ईश्वर, अल्लाह, गाॅड हे आहेत. आपल्याच संरक्षणासाठी त्यांनी निसर्ग नावाची शक्ती निर्माण केली आहे. त्या शक्तीचे भान ठेऊनच आपण प्रत्येक उपक्रम राबवायला हवा अन्यथा असे उत्सव साजरे करायला आपल्या पुढच्या पिढ्या मुकतील.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ ऑगस्ट २०१७ (गणेश चतुर्थी)


2 comments:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...