Friday, November 27, 2020

निलावती

उकडलेल्या बटाट्यात कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कडीपत्ता,तिखट,मीठ मिसळून तयार केलेल्या गोलाकार गोळ्यांना 'वडा' म्हणत नाहीत. त्या गोळ्यांना जेव्हा बेसन पिठाच्या आवरणात गुंडाळून उकळत्या तेलात सोडले जाते तेव्हाच त्याला 'बटाटा वडा' हे नाव प्राप्त होते. आपल्याही आयुष्यात जरी सगळे रंग आणि चवी मिसळल्या गेल्या असल्या तरी संघर्षरुपी तेलात आयुष्य तळल्याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण होत नाही आणि जर त्याच तेलातून वेळीच बाहेर आलो नाही तर आयुष्य करपल्याशिवायही राहत नाही.

परिस्थितीच्या तेलात स्वतःला झोकून दिले की तुमची किंमत आपोआप वाढते. नुसतं कढईच्या जवळ बसून राहिलात तर कालांतराने तारुण्याचा वास सुटेल म्हणूनच सगळ्या गोष्टी जुळून आल्या की संघर्षरुपी तेलात उडी घेण्याचे सामर्थ्य ठेवा. हे जग तुम्हाला वेगळ्या नावाने ओळखायला लागेल. अहो सभोवताल आपल्याला खूप काही शिकवत असतो फक्त डोळ्याला दिसलेल्या गोष्टीवर मेंदूला विचार करायला भाग पाडले की असे तत्वज्ञान निर्माण होते. बाकी पुन्हा कधी वडा खाताना हा माझा लेख जरूर आठवा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२०

No comments:

Post a Comment

आरोग्यदायी तुकाराम

​ दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या  धडक कारवाईमुळे शक्य ...