`दिसतेय काय ? आभाळातून वाहणारी नदी. हे करोडो लिटर पाणी कसल्याही आधाराविना हवेत तरंगतय. अरे माणसा, जो आधार आभाळाने ढगाला दिलाय तोच मातीने तुला दिलाय. तू कितीही प्रगती कर फक्त मातीच्या मुळावर उठू नकोस. अन्यथा जेव्हा केव्हा आभाळाला दिसेल की तू मातीला त्रास देत आहेस तेव्हा ते फाटेल आणि तुझं सगळं काही वाहून नेईल. मग उगाच देवा दिकाच्या नावाने बोंबलत बसू नकोस. ज्या नदीला देवी मानतोस, तिचे पाणी तीर्थ म्हणून पितोस त्याच नद्यांना गटार केलीस तू. जिच्यात घाण टाकतोस तिच्यातच तुझं पाप धुण्यासाठी डुबकी मारतोस. आजवर कित्येक वैयक्तिक पापे धुतली आहेत तिने पण आता सामूहिक पापांची शिक्षा भोगायला तयार राहा.’
काल कॉलेजवरून येताना सहजच हा फोटो क्लिक केला होता. पहाटे तोच फोटो डोळ्यासमोर आला आणि त्यावरून वरील संदेश स्फुरला. सकाळी उठल्या उठल्या मी तो लिहून ठेवला. हे असलं मलाच का बरं सुचलं असावं याचा विचार करता करता कदाचित त्या निसर्गाला माझ्या करवी मानवाला काही संदेश द्यायचा असेल म्हणूनच हे मला सुचलं असावं असं वाटलं म्हणूनच हे पोस्ट केलं.
बाकी ही काही मनोरंजनात्मक पोस्ट नाही. कित्येकजण तर फक्त फोटो पाहून स्क्रॉल करतील पण जे थांबतील, वाचतील ते निदान यावर क्षणभर विचार करतील आणि तेच साध्य असेल. तसेही या कलियुगात चांगलं ते दबलं जातं आणि वाईट ते वेगाने पसरत राहतं. या संदेशाचंही कदाचित तसंच होईल. पण काही लोकांपर्यंत जरी हा विचार पोहचू शकला तरी सूचनं सार्थकी लागेल म्हणून हा अट्टाहास.
विशाल गरड
२ ऑगस्ट २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment