कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात आज माझ्या या दोस्ताच्या मार्मिक आणि दर्जेदार कविता ऐकून तुफान पोसिटीव्ह झालो. बालाजीचे प्रत्येक काव्य नेहमीच माझ्या काळजाला भिडते आज मात्र बालाजीने त्याच्या खास ठेवणीतल्या जब्राट कविता त्याच्या आवाजात ऐकवल्या. त्याने ऐकवलेले प्रत्येक शब्द जणू उन्हाने तापलेल्या मातीवर पहिल्या पावसाचे थेंब पडल्यावर जसे ढेकूळ फुगतो तसं माझं हृदय फुगून त्यात झिरपले. भविष्यात जेव्हा केव्हा बालाजीचा काव्यसंग्रह प्रकाशित होईल तेव्हा तो नक्कीच साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावेल यात शंका नाही.
शेती माती वरील त्याच्या काव्यरचना साहित्यातील एक अद्भुत आणि उत्कट वर्णन आहेत. आता जोपर्यंत त्याच्या सगळ्या कविता पुस्तक स्वरूपात संग्रह करत नाही तोपर्यंत मलाच चैन पडणार नाही. प्रिय बालू, पोलिस अधिकाऱ्याच्या जाड जुड वर्दीत तुझ्या मनाला फुटलेला हा कवी मनाचा झरा संबंध मानवजातीला सुखावणारा आहे. दोस्ता, असंच लिहीत राहा आणि ऐकवत राहा. तुझ्या काव्यरुपी कस्टडीत राहायला आम्हाला नेहमीच आवडेल.
विशाल गरड
दिनांक : २१ एप्रिल २०२१
No comments:
Post a Comment