Saturday, April 10, 2021

काळाची गरज Remdesivir

सध्या रेमडीसिव्हीअर या इंजेक्शनचे उत्पादन वाढवणे ही प्राथमिकता असायला हवी. राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी आपले जे काही वजन आहे ते तिथे वापरायला हवे. सर्वसामान्य माणसाच्या हातात जेव्हा डॉक्टर रेमडीसिव्हीअरची चिठ्ठी लिहून देतात तेव्हा तो फक्त फेसबुकवर टाकून याचना करू शकतो अथवा पेशंट मरायला सोडून देऊ शकतो. यापलीकडे त्याच्या हातात काहीच नाही. त्याची हतबलता डोळ्यात पाणी आणणारी आहे. मायबाप सरकार, राज्यातील प्रत्येक कोविड सेंटरला इंजेक्शनचा पुरवठा तात्काळ सुरू करा, लाखो जीव वाचतील, इंजेक्शन काय खायची किंवा प्यायची वस्तू नक्कीच नाही पण जे कोणी त्याचा पैसे कमवायची वस्तू म्हणून साठेबाजी करत आहेत त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या दोस्तांनो. या पोस्टचे गांभीर्य तेच समजू शकतात ज्यांच्या घरातली व्यक्ती ऑक्सीजन बेडवर सिरीयस आहे आणि डॉक्टरांनी त्यांना चिठ्ठीवर रेमडीसिव्हीअर लिहून दिले असेल. देव करो ही वेळ कुणावरही येऊ नये. काळजी घ्या !

विशाल गरड
दिनांक : १० एप्रिल २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...