Sunday, May 7, 2017

| बाहुबली २ ©

मला बाहुबली दोन वर शिवचरित्राचा प्रभाव दिसतोय
होय ! जसा जसा मी हा चित्रपट पाहत गेलो यातल्या बहुतांशी प्रसंगाचे साम्य शिवचरित्रातल्या प्रसंगाशी असल्याची जाणिव झाली. महाराजांच्या गणिमीकाव्याचा तंत्रशुद्ध उपयोग मोठ्या खुबीने या चित्रपटात करण्यात आला आहे. जर शिवरायांच्या चरित्रातले काही प्रसंग घेऊन एवढा भव्य दिव्य चित्रपट उभा राहु शकतो तर साक्षात शिवछत्रपतींवर निघणारा चित्रपट किती भव्य दिव्य असायला हवा. चित्रपट हे खुप प्रभावी माध्यम आहे. शिवरायांचा गणिमीकावा (शिवनिती) आज पुन्हा एकदा  बाहुबलीमुळे सबंध जगाला कळल्याचे समाधान वाटत आहे.

| चित्रपटात दाखवलेले शिवचरित्रातले क्षण 👇

●देवसेनेच्या राज्यावर जेव्हा शत्रुंचे आक्रमन होते तेव्हा बैलांच्या शिंगांना आगीचे टेंभे लावण्याचा प्रसंग
●शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणुन वन्य प्राण्यांचा केलेला बंदोबस्त
●स्रीवर हात टाकला तर सेना नायकाचे मुंडके उडवण्याचा प्रसंग
●राजाची रयतेशी असलेली जवळीक
●अष्टप्रधान मंडळ
● शिवरायांप्रमाणेच महादेवावर असलेली बाहुबलीची श्रद्धा
●देवीच्या नावाची घोषणा (माहिष्मती=भवानी)
●सिंहासनावर बसुन चालवलेली राजसदर
●कमी सैन्यबळावर केवळ गणिमीकाव्याने जिंकलेल्या लढाया.
●अखेरच्या युद्धात झाडांचा गोफणीसारखा केलेला उपयोग
●आईचा शब्द प्रमाण माणण्याची परंपरा
●आग्रा ते रायगड शिवाजी महाराजांचे देशाटन तसेच बाहुबलीचेही देशाटन
●मेघडंबरीवरील शिवगामी देवीच्या बैठकीची अदब
●स्वकियांकडुनच झालेला घात

या चित्रपटावर जर शिवचरित्राचा प्रभाव नसता तर सदर चित्रपटाचे समिक्षण मी फक्त "काका पुतण्याची लढाई आणि सासु सुनेची भांडणे" एवढंच केलं असतं.
काही का असेना पण शिवरायांचे विचार आणि त्यांची शिवनीती जबरदस्त पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक के. प्रसाद आणि दिग्दर्शक राजमौली यांचे विशेष आभार.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...